करमाळा तालुक्याचे सुपुत्र वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांना राज्यस्तरीय सुवर्णपद.

कांदळवन स्वच्छता मोहिमेची लिम्का बुक मध्ये नोंद.
टीम विजयदिप न्यूज.
करमाळा तालुक्यातील वांगी नं.१ चे सुपुत्र प्रशांत शशिकांतराव देशमुख यांना वन सेवेतील कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे २०१८-१९ चे सुवर्ण पदक जाहीर झाले असून त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
प्रशांत देशमुख यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण पुणे येथे घेतले. त्यानंतर कृषी कंपनी मध्ये सुपरवायझर या पदावर नोकरी करून सरळ सेवेचा अभ्यास चालू केला. सरळ सेवेत त्यांची वनपाल म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची नेमणूक जव्हार याठिकाणी झाली. तेथे संयुक्त व्यवस्थापन समितीमध्ये त्यांनी सुधारणा करून आपल्या कार्याची वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांनी त्या ठिकाणी वृक्षांची लागवड करून त्याची चांगल्या पद्धतीने निगा ठेवली या त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना मुंबई येथील कांदळवन या ठिकाणी नेमणूक करून नवीन विभागाचा कार्यभार सोपविला.
कांदळवन या ठिकाणी कार्यालयीन यंत्रणा अपुरी असताना देखील त्यांनी आपल्या कार्याचा आलेख उंचावत ठेवला, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था केली, या कालावधीमध्ये त्यांनी कांदळवन स्वच्छता मोहीम हाती घेऊन एक प्रकारचे आव्हान स्वीकारले. कांदळवन ची उत्तम स्वच्छता करून त्याची जागतिक ‘लिम्का बुक’ मध्ये नोंद केली. याकामी त्यांना मयूर मोटे व चौधरी यांचे सहकार्य लाभले.

मुंबई सारख्या शहरात अतिक्रमण ही मोठी समस्या असून त्यास प्रतिबंध करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणे, हे काम त्यांनी मोठ्या जोमाने करून अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी मोठ-मोठाले खड्डे करून घेतल्याने परत त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ शकले नाही.

२०१८-१९ या वर्षात १२ अतिक्रमना पैकी ८ अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी सुमारे सहा हेक्टर जमीन शासनाकडे संपादित झाली. त्यामुळे कांदळवन हे संरक्षण झाले. त्यांच्या तेथील कार्यकाळात त्यांनी ३ हजार ३०० झोपड्यांचे अतिक्रमण काढले. त्याचबरोबर शहरातील बांधकाम करून शिल्लक राहिलेले दगड, डेब्रेज यांची विल्हेवाट रात्री-अपरात्री या वनविभागाच्या जागेत करून टाकले जायचे त्यावर त्यांनी धाडसत्र चालू करून अनेक आरोपी पकडले.
याअगोदर त्यांच्या कामाची दखल घेवून जीवनदीप शैक्षणिक संस्था कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी (शहापूर) यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मौळवान जातीचे २ कोटीचे साग हस्तगत केल्याबद्धल त्यांना निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्था, घसई यांच्याकडून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
मुलाने चांगले काम केल्यामुळे त्याच्या कामाची दखल घेऊन त्याला शासनाच्या वतीने सुवर्ण पदक जाहीर झाले. त्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, त्याने आशाच प्रकारे पुढे काम करून राज्याचे व देशाचे नाव पुढे न्यावे. शशिकांतराव देशमुख. वडील.