सरकारचा मोठा निर्णय; दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या.

टीम विजयदिप न्यूज.
राज्यात कोरोना संसर्ग वाढतच चाललेला आहे अशा परस्थितीत शासनाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
बरेच दिवस दहावी व बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे परिक्षाचे काय होणार? याकडे लक्ष लागून राहिले होते.
या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर चर्चा झाली.
सध्याच्या स्थितीत परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ प्रसारित करून हा निर्णय जाहीर केला.