महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर! एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३० हजारावर.

टीम विजयदिप न्यूज.

महाराष्ट्रात दिवसेन-दिवस कोरोना विषाणूचा कहर वाढतच चाललेला असून काल दि.२१ मार्च रोजी राज्यात एका दिवसात तब्बल ३० हजार ५३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

राज्यात कोरोना प्रचंड वेगाने वाढत चाललेला आहे. मागील ५ दिवसात राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १ लाख ३० हजारच्या पुढे गेलेली आहे. यामध्ये २१ मार्च रोजी ३० हजार ५३५ रुग्ण, २० मार्च – २७ हजार १२६ रुग्ण, १९ मार्च – २५ हजार ६८१ रुग्ण, १८ मार्च – २५ हजार ८३३ रुग्ण, १७ मार्च – २३ हजार १७९ रुग्ण एवढी आहे.

मागील पाच दिवसात राज्यात वाढत चाललेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पहाता महाराष्ट्र राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.  राज्यातील नागरिकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे नाहीतर तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याती शक्यता आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरांसह या कोरोनाने राज्यातील ग्रामीण  भागातही थैमान घालायला सुरवात केली आहे. राज्यातील मोठया शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून पुण्यात काल दिवसभरात २ हजार ९०० करोना रुग्णांची भर पडलेली आहे. तर मुंबईमध्ये ३ हजार ७७५, नागपुरात ३ हजार ६१४ रुग्णांची भर पडलेली असून राज्यात दिवसभरात तब्बल ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!