इतर

‘पांडुरंग कारखान्या’कडून पोळा सणासाठी ऊस बिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत प्र.मे टन २४२६ रुपये अदा.

टिम: विजयदिप न्यूज.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप केलेल्या ऊसास पोळा सणासाठी प्रति मे. टन १२६ रुपये प्रमाणे ऊस बिल जाहीर केले असून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे. कारखान्याने या हंगामात गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास प्रति मे.टन २ हजार ४२६ रुपये प्रमाणे ऊस दर अदा केला असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते

कै.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार कारखान्याची वाटचाल चालू आहे गळीत हंगाम २०२१-२२ मधील उर्वरित एफआरपीची रक्कमही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दीपावली सणाच्या अगोदर दिली जाईल अशी माहिती चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली

यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की मागील गळीत हंगामाच्या वेळी कै.सुधाकरपंत परिचारक मालक दवाखान्यामध्ये अॅडमिट असतानाही त्यांनी फोन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोळा सणासाठी रक्कम देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यावेळीही पोळा सणासाठी ऊस बिल अदा केले होते. त्यांच्याच आदर्शानुसार यावेळीही चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे सूचनेनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोळा सणासाठी ऊस बिलापोटी रक्कम अदा करीत आहोत असे डॉ.कुलकर्णी म्हणाले.

गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये श्री.पांडुरंग सहकारी २०१ दिवस चालून १२ लाख ५१ हजार मे टन ऊस गाळप करून १४ लाख २५ हजार क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. या हंगामात कारखान्याचा साखर उतारा ११.६५ टक्के राहिला असून हा साखर उतारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या को-जनरेशन प्लांट मधून ८.९२ कोटी युनिट निर्माण करून ४.६८ कोटी युनिटची वीज महावितरणाला विक्री केली आहे. कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पामधूनही या हंगामात १ कोटी २८ लाख लिटरचे उत्पादन झाले आहे. आसवांनी प्रकल्पामध्ये उत्पादित झालेल्या सर्व उत्पादनाची विक्री सर्वोच्च दराने चालू असून कारखान्यास त्यामधूनही उत्पन्न मिळत आहे. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याने सर्वच क्षेत्रात उच्चांक निर्माण केले आहेत.

पुढील गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याकडे सुमारे १४ हजार हेक्टरच्या ऊस नोंदी असून त्यामधून सुमारे १५ लाख मे टन ऊस उपलब्ध होईल त्यासाठी लागणारी सर्व तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली असून त्यांना अ‍ॅडव्हान्स हप्त्याचेही वाटप केले आहे कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ हा १ आक्टोबर २०२२ रोजी सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.

डॉ.यशवंत कुलकर्णी,

कार्यकारी संचालक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!