माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांनी पीक स्पर्धेत भाग घ्यावा. – गजानन ननावरे.

विजयदिप न्यूज.

कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकर्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकर्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या पीकस्पर्धेत प्रत्येक पिकाचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पीकस्पर्धा आयोजन केले आहे. तरी या योजनेत माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येन भाग घ्यावा असे आवाहन माळशिरसचे तालुका कृषि अधिकारी गजानन ननावरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादनाबाबत ‘प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल’ धैर्य वाढवून नवनवीन तंत्रज्ञान वापर करून कृषी उत्पादनात वाढ करणेसाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळावे म्हणून सन २०२० मध्ये रब्बी हंगाम मध्ये ज्वारी, हरभरा, गहू या पीक लागवड केलेल्या शेतकर्यांमध्ये सर्वसाधारण गट व आदिवासी गट या मध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पीकस्पर्धा आयोजीत केली आहे. शेतकर्यांना एकाच वर्षात पीकाच्या येणाऱ्या उत्पादकतेवर आधारीत पीक स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल यासाठी शेतकर्यांनी रु.३०० चे फी चलन ३१ डिसेंबर २०२० पर्यत जमा करावे लागेल. प्रत्येक पीकाचे स्पर्धे साठी सर्वसाधारण गटातून १० अर्ज व आदिवासी गटातून ५ अर्ज प्राप्त झालेवर स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रत्येक पिकाचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ३ क्रमांक काढणेत येतील व बक्षीसाची रक्कम २ हजार पासून ५० हजार रुपये पर्यत आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी यात सहभाग घ्यावा. असेही ननावरे म्हणाले.
अधिक माहितीसाठी मंडल कृषि अधिकारी सतिश कचरे यांचेशी संपर्क साधावा अथवा आपले गावचे कृषि सहायक यांचेकडून माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.