श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ९ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन.

‘पांडुरंग सहकारी’ जिल्हयामध्ये साखर उतार्यात प्रथम क्रमांकाचा साखर कारखाना.

टीम विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये आज अखेर ९ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे उत्पादन घेतले असून ‘पांडुरंग सहकारी’चा साखर उतारा हा बी-हेव्हीचे उत्पादन करुन त्यासह ११.३० टक्के असून हा साखर उतारा जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. कारखान्याकडून आज अखेर गाळप केलेल्या ९ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, दिनकरराव नाईकनवरे, माजी सभापती व कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन बाळासाहेब सालविठ्ठल, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या साखर पूजनाचा कार्यक्रम कोवीड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने घालून दिलेले सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करून करणेत आले.
यावेळी चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक माहिती देताना म्हणाले की, चालू गळीत हंगाम सुरु होऊन १२४ दिवसाचा कालावधी पुर्ण झालेला असून कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, उत्पादन विभाग, रसायन विभाग, शेती विभाग, डिस्टीलरी विभाग, अकौंट विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुयोग्य नियोजनाने कारखान्याने ८ लाख ३१ हजार ६६७ मे.टन गाळप करुन ९ लाख १ हजार १११ क्विंटल साखरपोती उत्पादीत केली आहेत. कारखान्याकडे आणखी सुमारे २ लाख मे.टन ऊस उपलब्ध असून कारखाना २५ मार्च पर्यंत चालवून उपलब्ध सर्व ऊसाचे गाळप करणार आहे. उर्वरित संपूर्ण ऊसाचे लवकरात-लवकर गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोंबर महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने नदी व ओढा काठावरील ऊस पाण्यामध्ये जाऊन त्याचे नुकसान झाले होते. तसेच कारखाना व्यवस्थापनाने पुरग्रस्त झालेल्या ऊसाचे लवकरात-लवकर गाळप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान झाले नाही. तरीही गतवर्षीच्या तुलनेत कारखान्याचा या वर्षीचा साखर उतारा चांगला राहीलेला आहे.
कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्प व डिस्टीलरी प्रकल्प यामधूनही चांगले उत्पादन सुरु असून को-जन मधून ५.४२ कोटी युनिट वीज निर्माण करुन २.८२ कोटी युनिट वीज महावितरणला विक्री केली आहे. तसेच आसवनी प्रकल्पामधून ६६ लाख लिटरचे उत्पादन घेतलेले आहे. कारखान्याने २५.७७ लाख लिटर बी-हेव्हीचे उत्पादन करुन त्यासह साखर कारखान्याचा साखर उतारा ११.३० टक्के असून हा साखर उतारा जिल्हयामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे.
यावेळी सभापती जयश्री व्हरगर, उपसभापती विवेक कचरे, माजी सभापती भगवानराव चौगुले, उपसभापती प्रशांत देशमुख, विष्णु रेडे, भाजप तालुकाध्यक्ष भास्करराव कसगावडे, संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत देशमुख, भैरु माळी, तुकाराम डुबल, दाजी भुसनर, हरीदास शिंदे, बाळासाहेब माळी, धोंडीराम पाटील, भजनदास फाळके, वसंत पाटील, राजूबापू गावडे, सिताराम नागणे, शिवाजी कोळवले, पुरुषोत्तम पवार व कारखान्याचे संचालक हरिषदादा गायकवाड, शिवाजीराव साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, सुरेश आगावणे, बाळासोा यलमार, तानाजी वाघमोडे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, दिनकरराव कवडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, नागन्नाथ शिंदे, भिमराव फाटे, अरुण घोलप आदि उपस्थित होते. साखर पोती पूजनास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी मानले.