इतर

रणजितदादांशी मतभेद नाहीत, माढा मतदार संघातून भाजपकडून मीच उमेदवार- खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर

टिम: विजयदिप न्यूज.

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदार संघातून भाजपकडून मीच उमेदवार असल्याचे विधान करत विद्यमान खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करून टाकली. तसेच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व माझ्यात कसलेही मतभेद नसल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी दिली.

राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अकलूज येथे लाभार्थ्यांना ६१ कोटी रुपयांचा निधी व साधने वितरित करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा.रणजितसिंह  नाईक-निंबाळकर यांनी आपल्या उमेदवारीबद्दल भाष्य केले.

मोहिते-पाटील आणि आपल्यामध्ये राजकीय वितुष्ठ आल्याच्या चर्चांना उधान आले आहे. यासंदर्भात उत्तर देताना खा.निंबाळकर म्हणाले की, मी विजयसिंह मोहिते-पाटील व सर्वांचा नेहमी आदर व सन्मान राखत आलो आहे. माझ्यात व आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या बरोबर देखील कसलेही मतभेद नाहीत. महाळुंग नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी पक्षाने दिलेले एबी फॉर्म मी तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडे सोपवले होते. पुढे ते त्यांनी अनिल जाधव यांच्याकडे सोपवले. तेंव्हापासून माझ्या संदर्भात शंकेचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. परंतु यामध्ये आपली कोणतीही भूमिका नव्हती किंवा मी दुसऱ्याच्या तालुक्यात कधीच राजकीय हस्तक्षेप करत नसल्याचे खा.निंबाळकर यांनी सांगितले.

आपला वावर माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील विरोधकांसमवेत जास्त असतो यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, के.के पाटील भाजपचेच आहेत. उत्तम जानकर डॉ.रामदास देशमुख, पाणीवचे प्रकाश पाटील आदी नेत्यांसमवेत आपला दोस्ताना आहे. एवढेच काय तर करमाळ्याचे आ.संजय शिंदे यांच्याशी देखील आपली घनिष्ठ मैत्री असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मैत्री आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या बाजू असल्याचे ते म्हणाले.

निरा देवघरच्या पाण्याचे श्रेय त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिले. पालकमंत्र्यांना आपण राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या घरी चहाला आवर्जून घेऊन गेला होता. इकडे आ.राम सातपुते त्यांच्या विरोधात वातावरण तयार करताना हा विरोधाभास तयार होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता गत लोकसभेवेळी जाणकारांनी मला मदत केली होती म्हणून मी पालकमंत्र्यांना त्यांच्याकडे चहाला घेऊन गेलो होतो. परंतु विधानसभेला आ.राम सातपुते यांच्यासाठीच काम करणार आहे. असे खा.निंबाळकर यांनी सांगितले .

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व माणचे आ.जयकुमार गोरे यांना मंत्रिपद देण्याची पहिली शिफारस मी केली होती, असे खा.निंबाळकर यांनी सांगितले. तरीही माझ्याबद्दल शंकाच व्यक्त होत आल्या आहेत. प्रत्येकाने राज्याच्या राजकारणात राहायचे की दिल्लीच्या राजकारणात जायचे याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे सूचक विधान खा.निंबाळकर यांनी केले. मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेन या त्यांच्या विधानाची आठवण करून दिली असता ते म्हणाले, पक्षाने त्यांना उमेदवार दिली तर त्यांचेही काम मी करणार आहे. परंतु २०२४ च्या निवडणुकीसाठी मीच लोकसभेचा उमेदवार आहे असे त्यांनी स्पष्ट करून टाकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!