महाराष्ट्र

दुर्दैवी घटना; आईसह दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू.

मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील घटना.

टीम विजयदिप न्यूज.

            मंगळवेढा तालुक्यामधील तळसंगी येथील तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

            रेश्मा बगताज शेख (वय ३५ वर्षे), सुफीया बगताज शेख (वय ११ वर्षे), खुशबू बगताज शेख (वय ९ वर्षे) असे मयत झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. घटनेची खबर आसलम नबीसो शेख  यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.

            याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी सकाळी तळसंगी गावाजवळ असलेल्या तलावामध्ये रेश्मा बगताज शेख व त्यांच्या मुली सुफीया व खुशबू  धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेल्या होत्या. 

            त्यावेळी  रेश्मा शेख यांचा पाय घसरून तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने बुडू लागल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी  सुफीया व खुशबू या मुलींनीही  पाण्यात उडी घेतली. मात्र मुलींनाही पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. 

            ही घटना पाहताच गावातील नागरिकांनी पाण्यात उड्या टाकून तिघींना पाण्याबाहेर  बाहेर काढले. मात्र  तिघींना पोहता येत नसल्यामुळे बुडून मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!