महाराष्ट्र

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती.

सहकारी संस्थांच्या निवडणुकास पाचव्यांदा मुदतवाढ.

टीम विजयदिप न्यूज.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांना राज्य सरकारने बुधवारी पुन्हा स्थगिती दिली. या संस्थांच्या निवडणुका सध्या आहे त्याच टप्प्यावर स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ही पाचवी मुदतवाढ आहे.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था आणि २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना या मुदतवाढीतून वगळले आहे. मात्र निवडणुकीबाबतचे नियम अंतिम होईपर्यंत या सोसायट्यांना निवडणूक घेता येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांना एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे.

राज्यात पुन्हा कोरोना संसर्गाचे संकट वाढत असल्यामुळे २४ फेब्रुवारी रोजीच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला आहे. त्यामुळे सहकारी संस्थाची निवडणुक प्रक्रिया ज्या टप्प्यावर सुरु आहे त्या टप्यावर थांबविण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याआधी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा ३० जूनपर्यंत, दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत तर १६ जानेवारी रोजी चौथ्यांदा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु चौथी मुदतवाढ त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला मागे घेत, निवडणुका घेण्याचा नवा आदेश काढला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!