श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून एफआरपी ची संपूर्ण रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग.

दिपावली सणासाठी सवलतीच्या दराच्या साखरेचे घरपोच वाटप.
टीम विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता,माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.१०० प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू.१० कोटी जमा केली आहेत. तसेच दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सभासद शेतकऱ्यांना कोविड-१९ चे सर्व नियम पाळून दिपावलीची सवलतीच्या दराची साखर व्यवस्थापन घरपोच करीत असून कारखाना कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शाचा वारसा कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक हे चालवित आहेत अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून गळीत हंगाम २०२०-२१ या गाळप हंगामात कारखान्याने १०.०६ लाख मे. टन ऊस गाळप करून ११.४४ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ११.१३ लाख क्विं. साखरेचे उत्पादन घेवून कारखान्याने उद्दीष्ठपुर्ती केली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कोवीड-१९ च्या परिस्थितीमुळे अर्थिक संकटात असताना पांडूरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊसास दिपावली सणासाठी प्रती मे. टन रू.१०० प्रमाणे ऊस बील देवून संपूर्ण एफआरपी रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना महत्वाचा असणारा दिपावली सण हा मोठ्या आनंदात साजरा करणेसाठी पैशाची गरज असताना कारखान्याने ऊस बिलाची रक्कम बँकेत खात्यावर वर्ग केली असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार कारखान्याची एफआरपी २ हजार ४३१ रुपये प्रति मे. टन असून कारखान्याने गाळप केलेल्या ऊसास पुर्वीच पहिला हप्ता २ हजार १०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे एकरकमी ऊस बिल दिले असून, कारखाना बंद झाल्याबरोबर १३१ रुपये प्रती मे.टन प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे. तसेच पोळा सणासाठीही रक्कम १०० रुपये प्रती मे. टन बिल अदा केले आणि आता दिपावली सणासाठी शेतकऱ्यांना १०० रुपये प्रती मे.टन प्रमाणे ऊस बील देवून शेतक-यांना पूर्ण एफआरपी ची रक्कम अदा केली आहे.
शेतकऱ्यांना दिपावली सणासाठी साखरेची गरज असते. त्यामुळे पांडुरंग कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या जमा असणाऱ्या रकमेच्या प्रमाणात सवलतीच्या दराची साखर कोविड-१९ चे सर्व नियम पाळून घरपोच वाटप करीत सुरू करण्यात आले आहे.
गळीत हंगाम २०२१-२२ सुरु करणेचे दृष्टीने कारखान्यामधील कामे पुर्ण झालेली असून गाळप हंगाम वेळेवर सुरु केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वहातुक यंत्रणा सक्षमपणे उभारली असून त्यांना संपूर्ण हप्त्याचे वाटपही पुर्ण केलेले आहे.
कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.१०० प्रमाणे ऊस बिल शेतकर्यांच्या बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू.१० कोटी जमा केली आहे. तसेच सवलतीच्या दराची साखर घरपोच करुन ऊस उत्पादकांची दिपावली गोड केली आहे. येणाऱ्या गळीत हंगामात कारखान्याकडे १६ लाख मे.टन ऊसाच्या नोंदी असून या संपूर्ण ऊसाचे गाळप करुन जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा व्यवस्थापन प्रयत्न करेल.
आ. प्रशांतराव परिचारक, चेअरमन