सोलापूर जिल्हा

कॉग्रेस व समविचारी पक्षांचे अकलूज प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

टीम विजयदिप न्यूज.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी ३ कायद्याचे विरोधात दिल्ली येथे मागील ११ महिन्यापासून काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी लाखो शेतकरी उन, वारा, पाऊस व शासनाचा अत्याचार या कशालाही न जुमानता आंदोलन करत आहेत. या शेतकरी बंधू भगिनींना पाठिंबा म्हणून कॉग्रेस व समविचारी पक्षाच्यावतीने सोमवार  दि.२७ सप्टेंबर रोजी भारत बंद केलेला आहे.

याचबरोबर केंद्र शासीत भाजप सरकारच्या उदासीन वृत्तीमुळे जीवनावश्यक वस्तूच्या केलेल्या भाववाढीने संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनता विविध पातळीवर अत्यंत त्रस्त आहेत. यासाठी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सार्वभौमत्व,  धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाहीच्या हक्काचे रक्षण करण्याकरीता कॉग्रेस कमिटी व समविचारी पक्ष यांचे वतीने कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ठीक-ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

माळशिरस तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीनेही सकाळी १० अकलूज प्रांत कार्यालया समोर  निदर्शने/धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्वसामान्य जनतेसह कॉग्रेस व समविचारी पक्षाच्या पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माळशिरस तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!