शेतीविषयक

नीरा उजवा कालव्यास रब्बीचे आवर्तन सोडले.

रब्बीच्या या आवर्तनात सिंचनासाठी कमी पाणी लागण्याची शक्यता.

विजयदिप न्यूज.

नीरा उजवा कालव्यस सिंचनासाठी रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यास आले असून वीर धरणातून कालव्यात ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास आले आहे. यात टप्प्याटप्याने वाढ करण्यात येणार आहे.

कालव्याच्या लाभक्षेत्रात यावर्षी सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा आहे. याचबरोबर कालवा लाभक्षेत्रातील भूगर्भात देखील पाणी पातळी चांगली असल्यामुळे अद्यापही ओढे-नाले वाहताना पहावयास मिळत आहेत.बोरवेल व विहीर सिंचनाची ज्या शेतकर्‍याकडे सोय आहे. त्यांना पाण्याची गरज कमी भासणार आहे परंतु कालव्याच्या पाण्यावरती अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांना या आवर्तनाची गरज आहे.

कालवा लाभक्षेत्रात यावर्षी सरासरीपेक्षा  खूपच  जास्त  पाऊस  झालेला असल्यामुळे या आवर्तनात सिंचनासाठी पाणी कमी लागणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा कमी वापरला जाण्याची शक्यता आहे व पाणी साठा टिकण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

धरण साठा दि.०३ डिसेंबर २०२०.

अ.नं.धरणाचे नावउपयुक्त पाणी साठा
(टीएमसी) मध्ये
टक्केवारी
१.निरा-देवघर११.७३ टीएमसी१००%
२.भाटघर२३.२६ टीएमसी९८.९७%
३.वीर९.३४ टीएमसी९९.२९%

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!