महाराष्ट्र

उजनीतून कालव्यास सलग दोन महीने पाणी; पुढील आठवड्यात सोडणार पाणी.

शेतकर्‍यांकडून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली.

टीम विजयदिप न्यूज.

      उजनी धरनामधून उन्हाळी हंगामाचे आवर्तन पुढील आठवड्यात सोडण्याचे संकेत लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता डी.बी साळे यांनी दिले आहेत.

      कालवा सल्लागार समितीची बैठक १२ मार्च रोजी घेण्यात येणार होती परंतु ती पुढे ढकलण्यात आली असून पुढील आठवढ्यात बैठक घेण्यात येणार असून पुढील आठवड्यातच २० मार्च पर्यंत उजनी धरणाच्या कालव्यामधुन पाणी सोडण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.

      सदया उन्हाचा चटका वाढू लागलेला असून उजनी कालवा लाभक्षेत्रातील बोरवेल व विहरींची पाणी पातळी झपाट्याने खालवू लागलेली आहे. तसेच उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिकांना जास्तीच्या पाण्याची गरज भासू लागलेली असून उजनी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे.

कालव्यास उन्हाळी हंगामातील दोन आवर्तने सोडली जाणार असून ती सलग सुटणार आहेत. यामध्ये मार्च ते एप्रिल व एप्रिल ते मे असे सलग दोन महीने पाणी कालव्यास सोडले जाणार आहे. पाणी हे शेतकर्‍यांनासाठीच असून शेतकर्‍यांना पाणी भरपूर दिले जाणार आहे.

डी.बी साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण, सोलापूर.

उजनी धरण दि.१३ मार्च २०२१ सायं. ६.०० वा.

पाणी पातळी४९५.९० मी.
एकूण पाणीसाठा२७७७.५६ द.ल.घ.मी.
उपयुक्त पाणीसाठा९७४.७५ द.ल.घ.मी.
एकूण पाणीसाठा TMC मध्ये९८.०८ TMC
उपयुक्त पाणीसाठा TMC मध्ये३४.४२ TMC
टक्केवारी६४.२५%

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!