धरण पाणीसाठा

भाटघर धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले

टीम विजायदिप न्यूज.

नीरा खोर्‍यातील सर्वात मोठे २३.७५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेले भाटघर धरण रविवारी पहाटे २.४५ वाजता १०० टक्के भरले आणि धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. एकामागून एक ११ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेले ब्रिटीशकालीन भाटघर धरण रविवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे २.४५ वाजता १०० टक्के भरून धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. सुरवातील स्वयंचलीत दरवाजांमधून १ हजार १७१ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरु होता. त्यात सकाळी ७ वाजता वाढ होऊन तो ७ हजार क्युसेक्स एवढा झालेला आहे. तर धरणाच्या विजनिर्मिती प्रकल्पामधून १ हजार ६२४ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे भाटघर धरणाच्या पाण्यातून ओलिताखाली आहे. धरणास ४५ स्वयंचलीत आणि ३६ रोलिंग दरवाजे तर ३ आपत्कालीन असे एकून ८४ दरवाजे आहेत.

यावर्षी नीरा खोर्‍यातील इतर धरणे लवकर भरली परंतु भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाला उशीरा सुरुवात झाल्याने धरण भरण्यास २२ दिवसांचा जास्त कालावधी लागला गतवर्षी धरण २० ऑगस्ट २०२० रोजी भरले होते.

नीरा खोर्‍यातील दुसरे ११.९३ टीएमसी क्षमता असलेले नीरा देवघर धरण अगोदरच १०० टक्के भरले असून या धरणाच्या सांडव्यामधून १ हजार ७४४ तसेच वीजनिर्मिती प्रकल्पामधून ७५० क्युसेक्स विसर्ग नीरा नदीत सोडला जात आहे. तर गुंजवणी धरणही ९७.५७ टक्के भरले असून लवकरच हे धरण सुध्दा १०० टक्के भरेल.

भाटघर, गुंजवणी व नीरा-देवघर या सर्व धरणातील पाणी हे वीर धरणात येत असल्यामुळे वीर धरण सुध्दा यावर्षीच्या पावसाळ्याच्या हंगामात दुसर्‍यांदा आज रात्री उशिरा किंवा उद्या १०० टक्के भरेल. सदया वीर धरणात ७९.६० टक्के एवढा पाणीसाठा आहे.

नीरा खोर्‍यातील धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावाचे प्रमाण असेच राहिले तर पुन्हा एकदा वीर धरनामधून नीरा नदीत विसर्ग सोडला जाऊ शकतो त्यामुळे नीरा नदीला पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!