निवडणूक काळात व्यवसाय धारकांनी नियमांचे पालन करावे; नियमांचे उल्लंघन करणार्यावरती कडक कारवाई- निलेश बागाव

रोडच्या बाजुला एक कॅमेरा व्यवसायधारकांनी लावला पाहिजे
टिम: विजयदिप न्यूज
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात सर्व व्यवसाय धारकांनी नियमांचे व वेळेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल व त्याचा परवाना सस्पेंड ठेवेला जाईल असे प्रतिपादन वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांनी व्यक्त केले.
आगामी ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने वेळापूर पोलीस स्टेशन मध्ये वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील हॉटेल चालक, बिअर बार परमिट रूम, लॉज धारक आदींची बैठक वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांनी बोलविली होती.
पुढे बोलताना बागाव म्हणाले की, हॉटेल, लॉजेस, बियरबार धारक यांनी रोडच्या बाजूला एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अत्यंत गरजेचे आहे, आपल्या हॉटेल अथवा बिअर बारमध्ये रोजच्या संशयित इसमांच्या हालचाली किंवा मीटिंग बाबत पोलीस खात्याला माहिती द्यावी, बियर बार, लॉजेसवर येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांची माहिती पोलिसांना द्यावी, तसेच आपल्या बियरबार अथवा लॉजवर किंवा हॉटेल मध्ये येणाऱ्या वाहनांचे पार्किंगची नियोजन करणे अत्यंत गरजेचे असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात सर्व नियमांचे पालन करावे असे आव्हान व्यवसाय धारकांना बागाव यांनी केले.
या बैठकीस उप-निरीक्षक किशोर तनपुरे, उप-सपोनि संजय रेगूडे, उप-सपोनि संजय राऊत, पोलीस हेडकॉस्टेबल उमेश चव्हाण, पोलीस नाईक नितीन लिंगडे यांच्या सह वेळापुर हद्दीतील ४० ते ५० व्यवसायधारक उपस्थित होते.